RSS 100 Years Formation Three Bans And Babri Demolition The Complete History Of Rashtriya Swayamsevak Sangh : जाणून घेऊ 100 वर्षाचा इतिहास
RSS 100 Years Formation Three Bans And Babri Demolition The Complete History Of Rashtriya Swayamsevak Sangh : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपले 100 वर्ष पूर्ण केले आहे. डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी 1925 मध्ये याची स्थापना केली होती. ही भारतातील सर्वात मोठी सामाजिक सांस्कृतिक संघटन बनले. संघाने अनेक प्रकारचे चढ-उतार पाहिले. महात्मा गांधीजींच्या हत्या आणि आणीबाणी काळामध्ये त्यांच्यावरील निर्बंध लागले होते. भाजपा सारख्या पक्षाचे गठनही संघाच्या प्रेरणेतून झाले आहे.
RSS 100 Years Formation Three Bans And Babri Demolition The Complete History Of Rashtriya Swayamsevak Sangh : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ RSS ला गुरुवारी शंभर वर्षे पूर्ण झाले आहेत. आणि आपल्या स्थापनेनंतर या संघटनेने आतापर्यंतचा प्रवास केला आहे. चला जाणून घेऊया RSS च्या मागील 100 वर्षाचा इतिहास कसा राहिला.
- 1925 :- डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी 27 सप्टेंबरला RSS ची स्थापना केली.
- 1926:- 17 एप्रिल ला संघटनला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नाव मिळाले. तेव्हा हेडगेवार यांच्या नेतृत्वातील एका समूहाने चार प्रस्तावित नावापैकी या नावावर सर्वाधिक मतदान केले.
- 1926 :- पहिली नित्य शाखा नागपूर मध्ये 28 मे रोजी सुरू झाली.
- 1927 :- पदाधिकाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण शिबिर मे मध्ये झाले यामध्ये 17 जणांचा समावेश होता.
- 1928 :- मार्च मध्ये पहिल्या प्रतिज्ञा कार्यक्रमात 99 स्वयंसेवक सहभागी झाले.
- 1929 :- नोव्हेंबर मध्ये झालेल्या दोन दिवशी बैठकीमध्ये हेडगेवार यांना RSS सरसंघचालक बालाजी हुद्दार यांना सर कार्यवाहक आणि मार्तंडराव जोग यांना सरसेनापती नियुक्त करण्यात आले होते.
- 1930 :- काँग्रेसने संपूर्ण स्वराज्य ची घोषणा करत एक प्रस्ताव मंजूर केला डॉक्टर हेडगेवार यांनी सर्व शाखांना 26 जानेवारीला स्वातंत्र दिवस म्हणून साजरा करण्याची निर्देश दिले.
- हेडगेवार यांनी अनेक स्वयंसेवकांसोबत जंगल सत्याग्रह मध्ये भाग घेतला आणि त्यांना अटक ही झाली. हॉकी टोपी ऐवजी काळी टोपी RSS च्या गणवेशाचा भाग म्हणून स्वीकारण्यात आली.
- 1940 :- ब्रिटिश सरकारने संगत गणवेश आणि रूट मार्च वर प्रतिबंध लावले हिंदी आणि मराठी प्रार्थना चे स्थळ वर संस्कृत प्रार्थना सुरू करण्यात आली. हेडगेवार यांचे 21 जून ला निधन झाले. त्यानंतर माधव सदाशिव गोळवलकर यांना 3 जुलै रोजी RSS चे दुसरे सरसंघचालक म्हणून नियुक्त करण्यात आले.
- 1947 :- RSS स्वयंसेवकांनी केनिया मध्ये भारतीय स्वयम सेवक संघ ची स्थापना केली. ऑर्गनायझर आणि पांचजन्य साप्ताहिक पत्रिका सुरू करण्यात आली.
- 1948 :- 30 जानेवारीला महात्मा गांधी यांची हत्या नंतर RSS वर अनेक बंधने लावण्यात तत्कालीन आरएसएस प्रमुख माधव सदाशिव गोळवळकर आणि हजारो स्वयंसेवकांना अटक करण्यात आली.
- 1949 :- सरकारने 12 जुलै 1949 ला प्रतिबंध हटवले संघाचे संविधान तयार करण्यात आले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अभावी प ची स्थापना करण्यात आली.
- 1950 :- आरएसएसचा निर्णय घेणारी सर्वोच्च संस्था अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची पहिली बैठक मार्चमध्ये झाली. पाकिस्तान मधून आलेल्या हिंदू शरणार्थ यांना मदत साठी वास्तूहारा सहाय्यता समिती स्थापन करण्यात आली.
- 1952 :- गोरक्षा आंदोलनाला सुरुवात. वनवासी कल्याण आश्रम ची सुरुवात डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनसंघाची स्थापना.
- 1954 :- दादर, नगर, हवेली ला पोर्तुगालापासून मुक्त करण्यासाठी स्वयंसेवकांनी मदत केली.
- 1955 :- गोवा मुक्ती संग्रामामध्ये स्वयंसेवक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले भारतीय मजदूर संघाची स्थापना.
- 1963 :- 26 जानेवारीला दिल्लीमध्ये गणतंत्र दिवस परेडमध्ये आमंत्रण मिळाल्यावर जवळपास 3000 RSS स्वयंसेवकांनी पूर्ण गणवेश आणि बँड सोबत भाग घेतला.
- 1964 :- विश्व हिंदू परिषद विहिपची स्थापना झाली.
- 1973 :- 5 जूनला माधव सदाशिव वळवळकर यांचे निधन झाले. 6 जूनला बाळासाहेब देवरस तृतीय सर संघचालक झाले.
- 1975 :- इंदिरा गांधी सरकारने 25 जूनला आणीबाणी लागू केली. 4 जुलैला RSS वर दुसऱ्यांदा बंधने घालण्यात आली. सरसंघचालकांना अटक करण्यात आली.
- आणीबाणी विरोधात संघर्ष करण्यासाठी अखिल भारतीय लोक संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली.
- 1977 :- भारतीय जनसंघ चे नव गठीत जनता पार्टीमध्ये विलीन करण्यात आले आणि ती सत्तेमध्ये आली. सरकारने 22 मार्चला संघ वर असलेले संपूर्ण बंधने हटवली. जयप्रकाश नारायण यांनी 3 नोव्हेंबरला पटनामध्ये आरएसएसच्या बैठकीला संबोधित केले.
- 1978 :- दीनदयाळ शोध संस्थान ची स्थापना झाली.
- 1980 :- भारतीय जनता पार्टी भाजपा ची स्थापना झाली.
- 1981 :- संस्कार भारतीची स्थापना झाली.
- 1992 :- अयोध्येमध्ये बाबरी मस्जित विध्वंस नंतर 10 डिसेंबरला केंद्राने आरएसएस वर तिसऱ्यांदा बंधने घातली.
- 1993 :- सरकारद्वारे नियुक्त न्यायाधिकरण ने 4 जूनला संघावर लावलेले बंधने चुकीचे असल्याचे सांगून रद्द केले. अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद ची स्थापना.
- 1994 :- 11 मार्चला राजेंद्र सिंह उर्फ रज्जू भैया सरसंघचालक म्हणून घोषित झाले. संघाच्या अखिल भारतीय सेवा विभाग सुरू झाला. लघु उद्योग भारती ची स्थापना झाली.
- 1998 :- भाजपच्या नेतृत्वात असलेली राष्ट्रीय जनतांत्रिक गटबंधन ने केंद्र सरकारने बनवली त्याचे पंतप्रधान आरएसएस चे माजी प्रचारक अटल बिहारी वाजपेयी होते.
- 2000 :- के. एस. सुदर्शन यांना 11 मार्चला आरएसएस चे 5 वे सरसंघचालक म्हणून नियुक्त करण्यात आले.
- 2009 :- के एस सुदर्शन यांनी डॉक्टर मोहन भागवत यांना संघाचे पुढील स्वरसंघचालक म्हणून नियुक्त केले. सुरेश भैय्याजी जोशी यांना संघाचे सरकार्यवाहक म्हणून निवडण्यात आले.
- 2016 :- RSS ने स्वयंसेवकांच्या वर्दीतील खाकी चड्डीच्या जागी पॅन्ट वापरण्यास सुरुवात केली.
- 2021 :- दत्तात्रय होसबोले RSS चे सर कार्यवाहक म्हणून त्यांची निवड झाली.