Crop Loan Online New Portal : सरकारने सुरू केले हे नवीन पोर्टल
Crop Loan Online : आता सरकारने शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आणली आहे. सरकारने एक नवीन पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलचा काय फायदा होणार आहे? हे आज आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.
शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळवण्याची प्रक्रिया अधिक सुलभ तसेच पारदर्शक करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीयकृत बँकेकडून पीक कर्जासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सरकारने www.jansamarth.in शेतकऱ्यांसाठी जे नवीन पोर्टल आणले आहे त्या पोर्टल चे नाव आहे jansamrth Portal जनसमर्थ पोर्टल.
या जनसमर्थ पोर्टल द्वारे शेतकऱ्यांना घरबसल्या पीक कर्जाचा अर्ज करता येणार आहे. या पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डच्या मदतीने 2 लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज मिळू शकेल.
तर आता हा अर्ज कसा करायचा, यासाठी आवश्यक बाबी कोणत्या, याचे काय आहेत नेमके फायदे याची माहिती आज आपण पाहू.
अर्जासाठी आवश्यक बाबी
now get crop loan up to rs 2 lakh from home central government has launched this new portal
- अर्ज करण्यासाठी अर्जदाराकडे शेतकरी आयडी कार्ड असणे आवश्यक आहे म्हणजेच फार्मर आयडी शेतकऱ्याकडे असणे आवश्यक आहे.
- त्याचबरोबर शेतकऱ्यांचे आधार कार्ड देखील असणे आवश्यक आहे.
- आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर शेतकऱ्याकडे असावा.
- शेतकऱ्याकडे पॅन कार्ड असणे आवश्यक आहे.
- बँक खाते पासबुक अनिवार्य आहे.
या पोर्टलचा कसा होणार फायदा
Benefits Of Jansamrth Portal
- जनसमर्थ पोर्टल मुळे शेतकऱ्यांना वारंवार बँकेत जाण्याची गरज भासणार नाही.
- घरबसल्या ते त्यांची कामे या पोर्टल द्वारे करू शकतात.
- त्याचबरोबर विनाकारण फेऱ्या कर्ज नाकारले जाणार नाही आणि कमीत कमी कालावधीत कर्ज मंजूर होईल.
- या ऑनलाईन प्रक्रियेसाठी कोणतेही सरकारी शुल्क आकारले जाणार नाही.
- या पोर्टलमुळे 2 लाख रुपयांचे पीक कर्ज मिळू शकते.
असा करा अर्ज
- या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा व तालुकास्तरावर एक विशेष मोहीम राबवली जाणार आहे.
- तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी व जिल्हा अग्रणी बँक प्रतिनिधी यांचे समन्वयांनी वेळापत्रक तयार करण्यात येणार आहे.
- तसेच सेतू केंद्र, महा-ई-सेवा केंद्र व ग्राहक सेवा केंद्र यांचाही यामध्ये सहभाग असणार आहे.
- या पोर्टलवर अर्ज करण्याची प्रक्रिया ही मोफत असणार आहे. त्यामुळे जर कोणी पैसे मागितले तर जिल्हा प्रशासनाकडे तक्रार करावी.
- अर्ज भरून घेण्यासाठी प्रत्येक तालुकास्तरावर एक शिबिर राबवले जाईल.