Marathi Bodhkatha Veleche Mol : वेळेचे मोल

Marathi Bodhkatha : मराठी बोधकथा

Marathi Bodhkatha : टाईम इज मनी अस आपण म्हणतो की नाही म्हणतो, बघतो प्रसंगी आपण इतरांना सांगतो सुद्धा. निबंध लिहिताना आपण आवर्जून लिहितो की टाईम इज मनी प्रत्यक्षात मात्र खरंच आपण त्या वेळेला तितकंच महत्त्व देतो का रे! मुळीच नाही.

Marathi Bodhkatha तुम्हा मुलांना तर फार सवय असते आईनी काही सांगितलं पाच मिनिट थांब, ब्रश करून घे दोन मिनिटे थांब, हे आवरून घे पाच मिनिट थांब, दोन मिनिट, पाच मिनिट असं करता करता दिवसभरात किती तरी वेळ वाया घालवत असतो.

Marathi Goshti म्हणजे काय तर टाईम इज मनी असा आपण इतरांना सांगण्यासाठी चांगले वाटते पण स्वतः हे करताना आपण कृतीमध्ये करताना विसरून जातो.

Marathi Goshti आज आपण गोष्ट पाहणार आहोत ती गोष्ट आहे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर यांना आदराने, प्रेमाने बापूजी म्हणतात.

Marathi Goshti यांच्या संदर्भातील आज गोष्ट आपण पाहणार आहोत. आजच्या गोष्टीचे नाव आहे Marathi Katha वेळेचे मोल. चला तर मग सुरुवात करूया कथेला…

वेळेचे मोल

Veleche Mol

Marathi Katha : आता हे बापूजी हे साबरमती आश्रम मध्ये राहत होते आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती राष्ट्रपिता महात्मा गांधी अर्थात बापूजी साबरमती आश्रमात राहणारे.

बापूजी पंच्या नेसायचे, डोक्यावर उपरणं होतं, हातात काठी होती, डोळ्यावर चष्मा होता आणि या साबरमती आश्रमात रहात असताना त्यांनी त्या आश्रमातल्या स्वतः सगळ्यांसाठी नियम काही तयार केलेले होते.

हे नियम लावण्यामागचा उद्देश काय होता तर आश्रमातले जे काही काम होतं जे काही कार्यपद्धती होती ती व्यवस्थित रित्या पार पडावी म्हणून त्यांनी काही नियम ठरवून दिलेले होते.

इतरांसाठी बापूजी स्वतःसुद्धा नियम अतिशय चोखपणे स्वतः सुद्धा ती नियम पाळत होते आणि त्यामुळे इतरही लोक ते सुद्धा त्या नियमांचे पालन करत होते. तसा त्यांचा दंडकच होता. की जे नियम घालून दिलेले आहेत त्या नियमांचे उल्लंघन कोणीही करायचं नाही.

एकदा काय झालं बापूजी कसल्याशा महत्त्वाच्या कामात बसलेले होते. आणि त्या कामांमध्ये व्यग्र झाले गर्क झाले की त्यांना भोजनाची वेळ झाली याचा विसर पडला. आता त्या आश्रमामध्ये काय नियम होता की भोजनाची वेळ झाली की घंटा वाजवायची.

पण बापूजी कामात इतके व्यग्र होते की त्या घंटेचा आवाज त्यांना ऐकायलाच नाही आला. ते त्यांच्या महत्त्वाच्या कामात खूप व्यस्त झाले होते. एकाग्रचित्ताने म्हणून काम करत होते आणि त्यामुळे काय झालं भोजनाची जी पहिली पंगत बसणारी होती त्याच्या आधी जी घंटा झाली ती घंटा त्यांना ऐकायलाच आली नाही.

आता काय जशी घंटा झाली तसे लोक जेवायला बसले आणि बापूजी च काम झालं आणि त्यांनी घड्याळात पाहिलं भोजनाची वेळ होऊन गेली. घंटा वाजून गेली होती. लोक बसले असतील आता त्यांच्या लक्षात आलं पण आता नंतर दुसरी घंटा वाजणार आणि दुसरी पंगत बसणार होती.

बापुजी ने काय केले आपलं काम आवरलं सगळं आवरून ठेवून दिलं ते उठले त्या जागेवरून आणि भोजन कक्षाकडे जायला निघाले. भोजन कक्षाकडे आल्या नंतर रांगेत बापूजी उभे राहिले कारण पहिली पंगत जेवत होती आणि दुसऱ्या पंक्तीसाठी लोक उभी होती त्या रांगेत बापूजी जाऊन उभे राहिले.

आता ते एका गृहस्थाने एका व्यक्तीने या साबरमती आश्रमात आश्रमाचे हे तर मालक आहेत आणि हे रांगेत उभा असं कसं काय झालं आज त्याला प्रश्न पडला

मग काय त्याची काही समाधान होईना मग तो बापूजी जवळ आला इतरांप्रमाणे बापूजी प्रतिशा करत होते की दुसरी घंटा कधी वाजेल आणि आता पहिली ती पंगत उठेलांनी आपल्याला भोजन कक्षात जाऊन जेवायला बसायचं आणि मग त्या माणसाला मात्र फार अप्रूप वाटायला लागले की काय ही भानगड आहे.

तो बापूजी पर्यंत आला आणि हात वगैरे जोडले नमस्कार केला बापूजींना नम्रपणे त्यांना विचारलं की बापूजी तुम्ही तर या आश्रमाचे मालक आहात. तुम्हीच रांगेत उभे राहा मला योग्य वाटत नाही. पण आता बापूजींनी सगळ्यांना घालून दिलेला होता आणि मग त्याचं समाधान होण्यासाठी त्याला जो प्रश्न बापूजींना विचारला होता त्याचे उत्तर अतिशय शांतपणे दिले.

ते म्हणाले त्याचं काय झालं मगाशी भोजनाची घंटा झाली पण मी माझ्या कामात होतो आणि त्या कामामध्ये इतका गर्क झालो होतो की मला काही ती घंटा ऐकू आली नाही. आणि माझं काम संपलं आणि घड्याळात पाहिलं तर बराच वेळ होऊन गेलेला होता.

पहिल्या पंगतीला मग आता नियमाप्रमाणे त्यावेळी भोजनासाठी यायला हवं होतं पण मी काही आलो नाही. मला काय तो नियम पाळता आला नाही. मी मुद्दामून तो नियम मोडला नाही. कारण एका वेगळ्या कामात व्यस्त होतो.

माणसाला प्रश्न पडला परत “म्हणून काय झालं” तरीसुद्धा “बापूजी आपण तर” तो बोलला आणि बापू म्हणाले नियम म्हणजे नियम. सर्वांसाठी सारखाच असायला हवा. की मी मालक आहे म्हणून माझ्यासाठी वेगळी नियम.

प्रत्येकाने आपल्या आयुष्यात जगताना या नियमांचं उल्लंघन करायला नको नियम घालून घ्यायला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं वेळ पाळली पाहिजे. म्हणजे लहान मोठा हा भेदभाव असू नये असं माझं मत आहे. एक लक्षात ठेवा वेळ आणि नियम यांचं काटेकोर पालन करावं.