Marathi Bodhkatha kunich nasat nirupyogi : कोणीच नसतं निरुपयोगी

Marathi Bodhkatha : मराठी बोधकथा

Marathi Bodhkatha मुलांनो आज आपण “कोणीच नसतं निरोपयोगी” अशी कथा या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. प्रत्येकाला काही ना काहीतरी महत्त्व देण्यात आलेलं आहे.

Marathi katha : अगदी ती छोटीशी मुंगी असो किंवा मोठा हत्ती असो. प्रत्येक माणसाला, प्रत्येक वस्तूला, प्रत्येक गोष्टीला काहीतरी महत्त्व देण्यात आलेलं आहे.

marathi goshti कोणतीही वस्तू , कोणताही व्यक्ती, कोणताही प्राणी हे आपल्यासाठी निरोपयोगी नसतं. प्रत्येकाचा कुठे ना कुठेतरी उपयोग होतच असतो.

marathi goshti अशी कथा आज आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया कथेला…

कोणीच नसतं निरुपयोगी

kunich nasat nirupyogi

Marathi Bodhkatha मुलांनो एक होती आनंदनगरी. या आनंद नगरीचा सुखसेन राजा होता. आणि या राजा कसा होता माहिती एका हातात धाडसी होता पराक्रमी होता शूर होता आणि प्रजा दक्ष होता.

त्याच्या गुणांमुळे तो त्याच्या आजूबाजूच्या परिसरात अतिशय प्रसिद्ध होता या राजाची त्याच्या प्रजेकडून वर फार म्हणजे फार प्रेम होतं.

मात्र त्या राजाचा स्वभाव थोडासा विचित्र होता बर का. म्हणजे कसा त्याला जर एखादी वस्तू निरुपयोगी आहे असं लक्षात आलं की तो काय करायचं माहिती लगेच त्या वस्तूचा नाश करून टाकायचा.

एकदा काय झालं! राजाचा दरबार भरला होता आणि आपल्या दरबारातील विद्वान मंडळींना एक प्रश्न केला. वस्तू किंवा प्राणी पक्षी किंवा कीटक हा निरुपयोगी आहे ते विचार करून मला सांगा.

राजाच्या त्या प्रश्नावर विद्वान मंडळींनी खूप विचार केला. अनेक संदर्भ देखील शोधले, पण त्यांना निरुपयोगी असं काही असतं हेच लक्षात येईना. ईश्वराने निर्माण केलेली कोणतीच गोष्ट ही निरुपयोगी नाहीये.

महाराजांना पटेल रुचेल असे उत्तर कसा आणि कोणी द्यायचं. महाराजाच्या दरबारातल्या पंडित विद्वान मंडळी विचार करू लागली. शेवटी आता काहीतरी सांगून वेळ मारून न्यायची असा त्यांनी विचार केला.

त्या मंडळींनी सांगितलं पुन्हा दुसऱ्या दिवशी महाराजांचा दरबार भरला आणि विद्वान मंडळी बसलेली महाराज त्यांच्या असनावर बसले आणि आणि महाराजांना मंडळींनी सांगितलं की, आम्ही खूप विचार केला खूप संदर्भ पाहीले आणि मग आमच्या असं लक्षात आलं की फक्त आणि फक्त जंगलातली जंगली माशी आणि उगाच कुठे जाळ करणारा कोळी हे दोघेच निरूपयोगी आहेत म्हणे.

कसं तर बघा म्हणे महाराज माशी खूप त्रास देते डंख मारते आणि हा कोळी जाळी विणून त्या जागेची सुंदरता कमी करतात.

त्या विद्वान मंडळीनि अतिशय अक्कलहुशारीने महाराजांना उत्तर दिलं आणि उत्तर ऐकल्यानंतर महाराजांनी दुसऱ्यादिवशी आदेश दिला. आपल्या राज्यातून ची माशी आणि हा कोळी या दोघांनाही पळवून हुसकावून लावा.

झाला आता राजाचा आदेश या आदेशाची अंमलबजावणी होण्याच्या आधीच काय झालं पण या राजाच्या आनंद नगरीवर परकीय आक्रमणाचा संकट आलं.

परकीय सैनिकाने किंवा दुसर्या शत्रूनि इथे आक्रमण केले या आनंदनगरीवर. मग प्रजादक्ष राजा आणि कर्तव्यतत्पर महाराज सुखसेन होता यांनी काय केले प्रयत्नांची पराकाष्टा केली युद्ध झालं, घनघोर युद्ध झालं त्या शत्रु सैन्याशी.

पण शत्रूकडून मोठी हार या सुखसेन राजाला पत्करावी लागली. आनंदनगरीच्या सुखसेन राजाचा पराजय झाला. त्याला हार पत्करावी लागली. इतकंच नाही बर का मुलांनो स्वतःचा जीव वाचवण्यासाठी जंगलात पळाव लागलं

कारण शत्रू सैनिक खूप प्रबळ होतं आणि महाराजांचा पाठलाग करत करत ते सैन्य जंगलात सुद्धा पोचली. आता महाराज जंगलात गेले. जंगलात कुठेतरी जाऊन लागलं पण मी म्हटलं की ते शत्रूचे सैन्य होतं ते माग काढत काढत काढत जंगलात महाराजांचा पाठलाग करत पोहोचले.

आता सुखासेन महाराज अशाच एका आश्रयाला एका जागी गेले. तिथे माशा व त्या माशांनी महाराजांचा पाठपुरावा करायला सुरुवात केली, एक दोन माशांनी त्यांना चावा सुद्धा घेतला. तेव्हा त्या माशांपासून दूर जाण्यासाठी आपला स्वतःचा बचाव करण्यासाठी महाराज पुन्हा जंगलात सुरक्षित जागा शोधू लागले.

शेवटी महाराजांना जवळच एक अंधारी जागा दिसली. मग त्यांनी काय विचार केला की आपल्याला जर या शत्रूपासून आपला बचाव करायचा असेल तर आपल्याला या गुहेत शिरावे लागेल. आता काही पर्याय नाही.

मग महाराज गुहेत गेल्यावर थोडेसे ते स्थिरावले विश्रांतीसाठी म्हणून त्यांनी जरा हातपाय पसरले पण त्यांना तिथे झोप लागली. कारण महाराज थकले होते. आनंद नगरी पासून जंगला पर्यंत महाराज जीव मुठीत ठेऊन धावत होते आणि थकल्यामुळे त्यांना

कदाचित झोप लागली. बराच वेळ निघून गेला. तीन चार तासांनी त्यांना जग आली. आणि जाग आल्यानंतर त्यांना काहीतरी ऐकू आलं. जरा कान देऊन ऐकण्याचा प्रयत्न केला तर तो होता घोड्यांच्या टापांचा आवाज.

शत्रूचे सैनिक महाराजांचा तपास काढत तिथे आले होते.बाहेरून न दिसणाऱ्या पण आत बसलेल्या महाराजांना बाहेरच्या व्यक्तींचा संभाषण मात्र चांगलं ऐकू येत होतं. ते सैनिक आपापसात बोलत होते.

पहिला सैनिक म्हणाला अरे मी तर त्यांना इकडे येताना पाहिलं होतं म्हणे त्या सुखसेन राजाला. दुसरा म्हणतो मग गेला कुठे तिसरा म्हणतो अरे शोधा त्याला इथेच कुठेतरी गुहे जवळ गेला असेल. चौथा मनाला नाही गुहेच्या तोंडावर कोळ्याचे जाळे दिसते म्हणजे इथे राजा नक्कीच आला नसेल आपण दुसरीकडे कुठेतरी असेल तर ते पाहुयात म्हणे.

सैनिक आपल्या घोड्यावर स्वार होऊन निघून गेले आता महाराजांनी हे सगळं संभाषण ऐकलं. सैनिक घोड्यावर बसून गेले घोड्यांच्या टापांचा दूर गेलेला हळूहळू येणारा आवाज नंतर नाहीसा झाला.

महाराज क्षणभर विचार करत बसले आपण तरी या कोळ्याला आणि माशीला हिसकावून लावण्याचा आदेश दिला होता

आता मात्र ज्या कोळ्यामुळे त्यांचे प्राण वाचले होते आज त्या कोळ्याला महाराज कृतज्ञतेने शोधायला लागले होते. कृतज्ञतेची भावना त्यांच्या मनात निर्माण झाली. कारण त्या छोट्याशा जिवान एवढ्या मोठ्या राज्याचे प्राण वाचवले होते. राजानं खूप शोध घेण्याचा प्रयत्न केला.

त्या गुहेमध्ये पण कोळी काय कुठे दिसला नाही. एखाद्या कपारीत तो गेला असेल. पण राजाने दोन्ही हात जोडले, डोळे बंद केले आणि मनोमन त्या छोट्या जीवाचे आभार मानले. मुलांनो कथेचा बोध काय जगात निरुपयोगी ठरेल असं काहीही नाही.

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA

खरे बोलल्याचे बक्षीस

 एका पैशाची चूक

संधी सोडू नका

सातत्याचा पाठ

‘मी’ चा त्‍याग

खोटं बोलू नये

बाल हट्ट

गुणांची पारख

वेळेचे मोल