What is the simla agreement why pakistan threatens to cancel it in marathi : सिमला करारामध्ये एलओसी सर्वात महत्त्वाचे

Shimla agreement and loc Pakistan withdrawal opens all options for india jprime 2025 in marathi : करार रद्द झाल्याने भारतासाठी सर्व पर्याय मोकळे

What is the simla agreement why pakistan threatens to cancel it पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान सोबतचा सिमला करार रद्द केला आहे. सिंधू करार ही भारताने रद्द केला आहे. या कारणांतर्गत पाकिस्तानला एक थेंबही पाणी देणार नसल्याचे भारताने स्पष्ट केले आहे. आता पाकिस्तानला थेंब थेंब पाण्यासाठी तरसावे लागणार आहे. तसेच सिमला करार रद्द झाल्यामुळे सिमला करारामध्ये समाविष्ट असलेला एलओसी हा महत्त्वाचा मुद्दा ही रद्द झाला आहे. त्यामुळे भारताला आता सर्व पर्याय मोकळे झाले आहेत.

Shimla Agreement Explain एलआयसी मध्ये ही सैन्य पाठवता येणार आहे? त्यामुळे आता लवकर भारताकडून पाकिस्तान विरोधात मोठी कारवाई केली जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र ही कारवाई कधी होणार? किती मोठी असेल? हे आज सांगणे कठीण आहे. चला तर मग आज आपण शिमला करारातील महत्त्वाच्या बाबींची माहिती पाहूया..

Shimla Agreement Explain पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतचा सिंधू करार रद्द केला आहे. प्रत्युत्तर म्हणून पाकिस्ताननेही सिमला करारासह द्विपक्षीय करार रद्द केले आहेत. मात्र पाकिस्तान सतत शिमला कराराचे उल्लंघन करत आहे जर पाकिस्तान शिमला करार पाळत नसेल तर भारतानेही तो करार पाळू नये, असे तज्ञांचे मत आहे. नियंत्रण रेषा एलओसीचा सन्मान करणे हा या कराराचा मुख्य मुद्दा आहे. शिमला करा रद्द झाल्यामुळे आता भारतालाही एलओसी पार करण्याचा पर्याय मोकळा झाला आहे.

what is simla agreement pakistans threat to cancel the shimla agreement in marathi पाकिस्तान सोबत 1971 मध्ये युद्ध झाल्यानंतर 2 जुलै 1972 ला शिमला करार झाला होता. पाकिस्तानच्या संसदेने याला 15 जुलैला आणि भारताने 3 ऑगस्ट 1972 ला स्वीकृती दिली होती. या करारानुसार काश्मीरची समस्या शांतता आणि चर्चेने सोडवणे होते मात्र पाकिस्तान कडून सतत या कार्याचे उल्लंघन करण्यात आले.

भारतासाठी सर्व पर्याय मोकळे

what is simla agreement pakistans threat to cancel the shimla agreement शिमला करारामध्ये म्हटले होते की भारत आणि पाकिस्तान आपसातील मतभेद शांततापूर्ण मार्गाने सोडवतील. करारामधून पाकिस्तानने माघार घेतल्यानंतर भारतासाठी सर्व पर्याय मोकळे झाले आहेत. यामध्ये सैन्य पर्यायही मोकळा झाला आहे.

2016 मध्ये सर्जिकल स्ट्राइक प्लॅनिंग करणाऱ्या कमांडर लेफ्टनंट जनरल( निवृत्त) डी एस हुड्डा त्यांच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानच्या या निर्णयाचे मोठे दोन परिणाम दिसून येतील. पहिला एलओसी आहे. शिमला करारा नंतर नियंत्रण रेषा निश्चित करण्यासाठी भारत पाकिस्तान सैन्य अधिकाऱ्याची एक टीम बनवण्यात आली होती. त्यांनी मॅप द्वारे एक लाईन निश्चित केली होती. आज लाईन ऑफ कंट्रोल आपण तिला म्हणतो. दोन्ही कडील अधिकाऱ्यांनी त्यावर सह्या केल्या होत्या आणि निश्चित करण्यात आले होते की आता हीच दोन्ही देशाची एलओसी रेषा आहे.

Simla Agreement हा करार रद्द झाल्यानंतर अजून स्पष्ट करण्यात आलेले नाही की लाइफ ऑफ कंट्रोलची मर्यादा काय आहे. याचा अर्थ असा आहे की आता या करारानंतर अशा प्रकारची कुठलीही सीमा दोन्ही देशांमध्ये संमतींची नाही? याचा अर्थ मग असा होतो का की आता कुठल्याही प्रकारची निर्धारित बॉर्डर सीमा नाही? एलओसी वर आता काही पण केले जाऊ शकते? हे अजून स्पष्ट करण्यात आल्या नाही त्यामुळे आता शिमलाकारातील एलओसी नियंत्रण रेषेचे पालन करायचे की नाही यावर लवकरात निर्णय होण्याची शक्यता आहे.

Simla Agreement पाकिस्तान सोबतच्या 1971 च्या युद्धामध्ये सहभागी असलेले लेफ्टनंट जर्नल निवृत्त मोहन भंडारी म्हणाले की ‘भारत यावेळी चार स्तरावर काम करत आहे. मनोवैज्ञानिक, राजकीय, राजनयिक आणि सशस्त्र सेना. सैनिकांनी आपल्या स्तरावर काम करणे सुरू केले आहे आणि लष्कर प्रमुख कश्मीर दौऱ्यावर आहेत. त्यांच्या मतानुसार कारवाई तर होणार.. मात्र कधी आणि किती मोठी होईल हे सेना ठरवणार आहे.

Shimla agreement and loc Pakistan withdrawal opens all options for india jprime पाकिस्तान विरुद्ध भारत किती मोठी कारवाई करू शकतो. या प्रश्नावर लेफ्टनंट जनरल भंडारी म्हणाली की, भारताचे टार्गेट पाकिस्तानातील सामान्य नागरिक नाहीत तर तेथील सैन्य आहे. कारण पाकिस्तान सैन्य दहशतवाद्यांचे आका आहेत. त्यांचे सैन्याचे प्रमुख असीम मुनीर गुप्तचर संस्था आयएसआयचे प्रमुख होते नुकतेच त्यांनी चेतावणीखोर भाषण केले आहे. त्यामुळे आता आपले टार्गेट उध्वस्त करायचे आहे. यासाठी भारतीय सैन्य संपूर्ण जगामध्ये ओळखले जाते.

पाकिस्तानकडून सतत नियमांच उल्लंघन

Shimla agreement and loc Pakistan withdrawal opens all options for india jprime सिमला करायचे तीन प्रमुख मुद्दे आहेत. पहिला म्हणजे द्विपक्षीय चर्चा. या अंतर्गत दोन्ही देश सर्व वाद आपल्या चर्चेतून सोडवतील आणि यामध्ये तिसऱ्या पक्षाला सहभागी करणार नाहीत. मात्र पाकिस्तान सतत विविध मंचावर काश्मीर मुद्दा वरून तिसऱ्या पक्षाला सहभागी करण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र भारतच्या कठोर विरोधामुळे यामध्ये तो कधीही यशस्वी झाला नाही.

दुसरे म्हणजे नियंत्रण रेषाचा सन्मान करणे. या करारामध्ये म्हटले आहे की दोन्ही देश नियंत्रण रेषेचे पालन करेल आणि एकमेकाविरुद्ध सैन्य दलाचा वापर करणार नाही. दोन्ही देश सतत एकमेकांची राष्ट्रीय एकता, क्षेत्रीय अखंडता, राजकीय स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वाचा सन्मान करेल. मात्र पाकिस्तानी केवळ आपल्या जमिनीचा भारताविरुद्ध वापर केला नाही तर त्यांनी 1984 मध्ये सियाचीन युद्ध आणि 1999 मध्ये कारगिल युद्ध घडून आणले.

तिसरा करार म्हणजे शांतता ठेवणे. या करारानुसार दोन्ही देशांमध्ये वाद दूर करण्यासाठी व्यापार आणि सांस्कृतिक आदान-प्रदान सारखे मैत्रीचे संबंध ठेवणे. मात्र पाकिस्तान कडून वरील दोन्ही कराराचे उल्लंघन सतत केल्यामुळे हाही करार त्यांनी पाळलेला नाही.

पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ला अमेरिकेने ही दहशतवादी कारवाई मानली आहे. या घटनेला प्रसिद्धी देताना न्यूयॉर्क टाईमने याला उग्रवादी (मिलिटेंट)हा शब्द वापरला आहे. अमेरिकेच्या विदेशी मामलेच्या समितीने सोशल मीडिया एक्स वर म्हटले आहे की, ते उग्रवादी नाही तर दहशतवादी (टेररिस्ट) आहेत.

अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाचे पूर्व अधिकारी आणि अमेरिकन इंटरप्राईज इन्स्टिट्यूटचे सीनियर फेलो मायकल रुबीन बोलताना म्हटले की, अमेरिकेने पाकिस्तानला दहशतवादी प्रयोजक देश आणि सेना प्रमुख मुनीरला दहशतवादी घोषित केले पाहिजे. ओसामा बिन लादेन आणि असीम मुनीर यांच्यामध्ये एकच अंतर आहे की लादेन गुफा मध्ये राहत होता आणि मुनीर महलामध्ये राहतो. त्यामुळे ते दोघेही एक सारखे आहेत आणि दोघांचाही अंत एकसारखाच झाला पाहिजे.