Trains will be available from every city in the country, including Mumbai and Pune, to 48 cities : विस्तार आणि रेल्वेची संख्या मध्ये होणार वाढ
Trains will be available from every city in the country, including Mumbai and Pune, to 48 cities : येणाऱ्या पाच वर्षांमध्ये मुंबई, पुणे, नागपूर “रेलनगरी” बनले तर चक्कीत होण्याची आवश्यकता नाही. रेलनगरी यासाठी की या स्टेशनवरील प्रवासी सुविधा, कनेक्टिव्हिटी, रेल्वे आणि प्रवाशांची संख्या मध्ये मोठी वाढ होणार आहे. देशातील कुठल्याही शहरात जाण्यासाठी या स्टेशनवरून रेल्वे सेवा असणार आहे.
दरम्यान रेल्वेच्या नेटवर्कला आधुनिक आणि सक्षम बनवण्याच्या दिशेमध्ये एक मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. त्यानुसार मुंबई, नागपूर, पुणे, भोपाळ, इंदोर यासह देशातील 48 प्रमुख रेल्वे स्टेशन रेल्वे हब म्हणून विकसित करण्याची योजना तयार करण्यात आली आहे.
ही योजना सुरू झाल्यानंतर या शहरांमध्ये रेल्वे स्टेशनची सर्व क्षमता आणि सुविधा दुप्पट होणार आहे. देशातील रेल्वे प्रवासाचे मार्गामध्ये वेगाने वाढ होत आहे. नवीन रेल्वे गाड्या चालवणे, त्यांची क्षमता वाढवणे आणि त्या दुप्पट करणे आवश्यक मानले जात आहे. त्यामुळे सध्याच्या रेल्वे स्टेशनची वर्तमान मधील स्थिती मजबूत करण्यासाठी रेल्वे आपला मास्टर प्लॅन अंतर्गत काम करत आहे.
या योजनेअंतर्गत टर्मिनलची क्षमता वाढवण्याबरोबरच संबंधित शहरा जवळील रेल्वे स्टेशनला ही लक्षात घेतले जाईल. त्या रेल्वे स्टेशनचा ही विकास करण्यात येणार आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव या योजनेवर विशेष लक्ष ठेवून आहेत.
मोठ्या प्रमाणावर मिळतील लोकल-लांब पल्ल्याच्या रेल्वे
रेल्वेने आपल्या योजनेमध्ये उपनगरीय आणि गैर उपनगरीय रेल्वे सेवा समावेश केला आहे. उपनगरीय रेल्वे सेवाचा विस्तारमुळे मुंबई, दिल्ली, कोलकत्ता सह अन्य काही शहरांमध्ये घर ते ऑफिस, कॉलेज किंवा कामावर ये-जा करणाऱ्यांसाठी अधिक लोकल रेल्वे चालवल्या जाणार आहेत.
याबरोबरच गर्दी सांभाळण्यासाठी मोठे प्लॅटफॉर्म, फुटवेअर ब्रिज अशा सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. तर गैर उपनगरीय साठी एक शहर ते दुसऱ्या शहरासाठी किंवा लांब पडल्याच्या प्रवासासाठी एक्सप्रेस, मेल एक्सप्रेस, वंदे भारत किंवा सुपरफास्ट रेल्वेची संख्या वाढवली जाणार आहे. यासाठी चांगले प्लॅटफॉर्म आणि टर्मिनल, आरामदायी प्रतीक्षालय विकसित करण्यात येणार आहेत.
तीन टप्प्यात होणार काम
The work will be done in three phases
रेल्वे स्टेशनची क्षमता दुप्पट करण्यात येणार आहे. जेणेकरून तत्काळ लाभ मिळू शकतील. ही योजना तीन टप्प्यांमध्ये लागू केली जाणार आहे. यामध्ये तात्काळ, आपत्कालीन आणि दीर्घकालीन मध्ये विभागणी करण्यात आली आहे.
ही होणार कामे
- शहर आणि त्यांच्या जवळचे रेल्वे टर्मिनल यांची निवड केली जाईल. जेणेकरून रेल्वेचा दबाव कमी होऊ शकेल. (ट्राफिक).
- सध्याच्या टर्मिनलवर नवीन प्लॅटफॉर्म जोडले जाणार आहेत. याबरोबरच रेल्वे उभी करण्यासाठी साफसफाई आणि तयार ठेवण्यासाठी स्टेबलिंग, लाईन फिट लाईन आणि शेटिंग व्यवस्था करण्यात येणार आहे.
- रेल्वेच्या देखरेखीसाठी, साफसफाईसाठी कोचिंग कॉम्प्लेक्स सह आधुनिक सुविधा विकसित करण्यात येणार.
- वेगवेगळ्या मार्गावर रेल्वेची वाढती संख्या सांभाळण्यासाठी सिग्नलिंग सिस्टीम अपडेट करणार.
- जेथे आवश्यक असेल तेथे मल्टी ट्रेकिंग करण्यात येणार.
या 48 शहरांचा समावेश
दिल्ली, मुंबई, कोलकत्ता, चेन्नई, जयपुर, जोधपुर, इंदोर, भोपाळ, उज्जैन, रायपूर, हैदराबाद, बंगळुरु, अहमदाबाद, पटना, लखनौ, पुणे, नागपूर, वाराणसी, कानपूर, गोरखपुर, मथुरा, अयोध्या, आग्रा, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, चंदीगड, लुधियाना, अमृतसर, जम्मू, वडोदरा, सुरत, माणगाव, कोचिन, पुरी, भुवनेश्वर, विशाखापटनम, विजयवाडा, तिरुपती, हरिद्वार, गुहाटी, भागल्पुर, मुझफ्फरपुर, दरभंगा, गया, मैसूर, कोयबतुर, टाटानगर, रांची आणि बरेली या शहराचा समावेश आहे.
आम्ही प्रवाशांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी आणि गर्दी कमी करण्यासाठी विविध शहरांमध्ये कोचिंग टर्मिनल सविस्तर करत आहोत. रेल्वे गाड्या आणि रेल्वेची क्षमता वाढवली जाणार आहे. या योजनेमुळे आमच्या रेल्वेची नेटवर्क समृद्ध होणार आहे आणि देशभरामध्ये रेल्वेचे जाळे निर्माण होईल आणि सुविधांमध्ये सुधारणा होणार आहे, अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.