india pakistan war news In Marathi : पाककडून 3 तासात शस्त्रसंधीचे उल्लंघन

india pakistan war news : हम नहीं सुधरेंगे…

india pakistan war news भारताने पाकवर केलेल्या आक्रमक कारवाईनंतर पाकिस्तान नरमला आहे. आणि शरणांगती पत्करत शस्त्रसंधीची विनंती पाकने केली. त्यानंतर शनिवारी सायंकाळी 5 वाजल्यापासून दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी लागू झाली होती.

india pakistan war news pakistan violates ceasefire भारतावर कुठल्याही प्रकारचा हल्ला करणार नसल्याचे आश्वासनही पाकने दिले होते. मात्र शस्त्रसंधी लागू झाल्यानंतर तीन तासाच्या आतच पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. सीमावरती भागामध्ये अनेक ठिकाणी गोळीबार करण्यात आला.

india pakistan war news pakistan violates ceasefire त्यामुळे या दोन्ही देशांमधील संबंध आता कुठपर्यंत आणतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कुत्र्याचे शेपूट कितीही सरळ करण्याचा प्रयत्न केला तरी ते सरळ होत नाही अशी गत पाकिस्तानची आहे. त्यामुळे पाकिस्तानवर किती विश्वास ठेवायचा यावरही भारताला विचार करावा लागणार आहे.

india pakistan war दरम्यान, हा भारताच्या बलशाली सैन्य दलांच्या सामर्थ्याचा आणि राजनैतिक मुत्सुद्देगिरीचा मोठा विजय आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी शनिवारी संध्याकाळी पत्रकार परिषदेत शस्त्रसंधीच्या निर्णयाची माहिती दिली.

india pakistan war पाकिस्तानच्या लष्करी मोहिमांच्या महासंचालकांनी(डीजीएमओ) दुपारी ३ वाजून ३५ मिनिटांनी भारताच्या डीजीएमओंना फोन करून शस्त्रसंधी करण्याची तयारी दर्शवली.

Ceasefire Breach उभय अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या सहमतीनुसार संध्याकाळी ५ वाजेपासून जमीन, हवा आणि सागरी मार्गाने कोणत्याही प्रकारची सैन्य कारवाई करण्यात येणार नाही. यासंदर्भात दोन्ही देशांचे डीजीएमओ येत्या १२ तारखेला दुपारी १२ वाजता सविस्तर चर्चा करणार आहेत, अशी माहिती मिस्त्री यांनी दिली.

Ceasefire Breach गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने ड्रोन, क्षेपणास्त्र हल्ले करणाऱ्या पाकिस्तानला शुक्रवार-शनिवारच्या रात्री भारताने जोरदार प्रत्युत्तर देत ६ लष्करी आणि वायुदलाच्या दोन तळांना लक्ष्य केले. यामध्ये पाक सैन्य दलांचे शस्त्रागार, नियंत्रण कक्ष, रडार यंत्रणा बेचिराख झाली आहे.

india pakistan Ceasefire भारताच्या या दणक्यामुळे पाकचे कंबरडे मोडले. यापुढे भारतावर हल्ल्याची आणि भारताच्या हल्ल्यांचा प्रतिकार करण्याची शक्तीच उरली नसल्याने पाकने या संघर्षातून माघार घेत शस्त्रसंधीची विनंती केली.

प्रत्युत्तरासाठी सैन्य सज्ज

india pakistan Ceasefire तूर्तास शस्त्रसंधी झाली असली तरी कुरापतखोर पाकिस्तानने भविष्यात दहशतवादी हल्ला, लष्करी कारवाईची आगळीक केली तर चोख प्रत्युत्तर देण्यात येईल. त्यासाठी आपली सैन्यदले सज्ज आहेत.

भारतविरोधी दहशतवादी कृत्य युद्ध मानले जाणार

india pakistan Ceasefire भविष्यात भारतीय भूमीवर कोणतेही दहशतवादी कृत्य देशाविरोधातील युद्ध मानले जाईल आणि त्यानुसारच प्रत्युत्तर दिले जाईल, अशी भूमिका सरकारने घेतली असल्याची माहिती शनिवारी सूत्रांनी दिली.

india pakistan war news या निर्णयासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने दहशतवादी हल्ल्यांबाबत स्पष्ट लक्ष्मणरेषा आखली आहे.

पाकपुरस्कृत दहशतवाद्यांनी जर यापुढे भारतात दहशतवादी हल्ले केले तर त्याचे प्रत्युत्तर म्हणून थेट सैन्य कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे. पाकसाठी हा कठोर संदेश आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी

india pakistan war news भारत आणि पाकिस्तानचा संघर्ष मिटवण्यासाठी अमेरिकेने यशस्वी मध्यस्थी केल्याचा दावा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. ट्रम्प यांनी ट्रूथ या आपल्या सोशल मीडियावर याबाबत घोषणा केली. ‘मला सांगण्यास आनंद होत आहे की, अमेरिकेच्या मध्यस्थीने रात्रभर चाललेल्या चर्चेनंतर भारत आणि पाकिस्तान तत्काळ व संपूर्ण शस्त्रसंधीसाठी तयार झाले.

सामंजस्य आणि विवेकबुद्धीने निर्णय घेतल्याबद्दल मी दोन्ही देशांचे अभिनंदन करतो’, असे ट्रम्प म्हणाले. यानंतर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी दिलेल्या माहितीनुसार, उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स आणि मी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्रमंत्री जयशंकर, एनएसए अजित डोभाल तसेच पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ, लष्करप्रमुख जनरल मुनीर यांच्यासोबत चर्चा केल्याचे सांगितले.

सिंधू करार तूर्तास स्थगितच

india pakistan war news शस्त्रसंधी लागू झाली असली तरी सिंधू पाणीवाटप करार तूर्तास स्थगितच राहणार आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने हा करार स्थगित केला होता. त्यामुळे पाकने मोठा थयथयाट केला. या कराराला मूर्तरूप देण्यास मध्यस्थी करणाऱ्या जागतिक बँकेकडे देखील पाकने धाव घेतली होती; परंतु जागतिक बँकेने हस्तक्षेप करण्यास नकार दिला. आता हा करार पुन्हा कधी लागू करायचा हे सर्वस्वी भारतावर अवलंबून आहे.