India-Pak War : गृह मंत्रालयाचे राज्यांना सूचना
India-Pakistan War News In Marathi : पाकिस्तानसोबतच्या तनावादरम्यान केंद्र सरकारने अनेक राज्यांना मॉक ड्रिल करण्याचे निर्देश दिले आहेत. गृह मंत्रालयाने राज्यांना ७ मे रोजी नागरिक सुरक्षासाठी मॉक ड्रिल करण्यास सांगितले आहे.
What Is Mock Drill राज्यांना हवाई हल्यापासून बचावासाठी मॉक ड्रिलचे निर्देश दिले आहेत. केंद्र सरकारच्या निर्णयाची टाइमिंग खूप महत्वाची आहे.
India-Pakistan War News यापूर्वी अशा प्रकारीची मॉक ड्रिल १९७१ मध्ये करण्यात आली होती. १९७१ मध्ये भारत-पाकिस्तान दरम्यान युद्ध झाले होते. या युद्धाच्या तब्बल ५४ वर्षांनंतर आता देशात मॉक ड्रिल होणार आहे.
Mock Drill in India गृह मंत्रालयाने ७ मे रोजी प्रभावी नागरिक सुरक्षेसाठी मॉक ड्रिल करण्याचे सांगितले आहे. यामध्ये खालील पाऊले उचलण्यास सांगण्यात आले आहे.
१. हवाई हल्ल्याचा इशारा देणारे सायरन वाजवले जातील.
२. हल्ल्याच्या स्थितीमध्ये बचावासाठी नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना नागरी संरक्षण (सिविल डिफेंस)चे प्रशिक्षण देणे.
३. मॉक ड्रिल दरम्यान ब्लॅक आउट केले जाईल.
४. महत्वाच्या यंत्रना वेळेवर लपण्यासाठीचे उपाय करणे.
५. अशा स्थितीत अडकलेल्या नागरिकांना वाचवणे आणि त्यांचा अभ्यास करण्यात येईल.
पहलगाव हल्ल्यानंतर तनाव
Mock drills will be held in 244 districts across the country
पहलगाव हल्ल्यानंतर सीमेवर मोठ्या प्रमाणात तनावाची स्थिती आहे. दहशतवाद्यांनी २६ निर्दोष नागरिकांना गोळ्या मारल्या.
पाकिस्तानने सतत ११ दिवसांपासून नियंत्रन रेषेवर भारतीय चौक्यांवर गोळीबार केला आहे. भारताने या होणाऱ्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले आहे.
मोदींची संरक्षण सचिवांशी भेट
What Is Mock Drill भारताने २०१९ मध्ये पुलवामानंतर जम्मू-काश्मिरमध्ये झालेल्या सर्वात भीषण हल्ल्यानंतर भारत कोणालाही सोडणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांची भेट घेतली. ही भेट अर्धातास चालली. दिल्ली या हल्ल्याविरोधात काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ही बैठक पंतप्रधानांकडून एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंह यांच्या भेटच्या दुसऱ्या दिवशी झाली आहे. पंतप्रधान मोदींनी आतापर्यंत सेना, नौसेना आणि वायु सेनेच्या प्रमुखांना भेटले आहेत.
मोदींचा इशारा
Mock Drill in India दहशतवादी हल्ला करणारे आणि त्याचा कट रचणाऱ्या अशी शिक्षा मिळेल की त्यांनी त्याची कल्पनाही केली नसेल, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. ही भावना जवळपास सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे.
तुम्हाला जे पाहिजे ते निक्की होणार आहे, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.
भारताची राजनैतिक पावले
India-Pakistan War News भारताने आतापर्यंत पाकिस्तानविरोधात अनेक राजनैतिक पावले उचललेली आहेत. यात १९६० चा सिंधू जल करार स्थगित करणे. या निर्णये भारताने १९६५ आणि १९७१ मधील युद्ध आणि १९९९ चे कारगिल युद्धादरम्यानही हे पाऊल उचलले नव्हते.
सायरन वाजल्यावर काय करावे?
- सुरक्षित स्थळी जाऊन थांबावे
- 5 ते 10 मिनिटांत सुरक्षित स्थळी पोहचा.
- सायरन वाजल्यावर घाबरुन जाऊ नका.
- सायरन वाजल्यावर उघड्या जागेपासून दूर व्हा.
- घर आणि सुरक्षित इमारतींमध्ये जाऊन थांबा.
- टीव्ही, रेडिओ, सरकारी अलर्ट्सवर लक्ष द्या.
- अफवांवर विश्वास ठेऊ नका. सरकारच्या निर्देशावर लक्ष द्या.
सायरन कुठे-कुठे वाजणार
- सरकारी भवन
- प्रशासनिक भवन
- पोलीस मुख्यालय
- फायर स्टेशन
- सैन्य ठिकाणे
- शहरातील मोठे बाजार
- गर्दी असणारी ठिकाणे
सिव्हिल मॉक ड्रिल कोण-कोण?
- जिल्हाधिकारी
- स्थानिक प्रशासन
- सिव्हील डिफेन्स वार्डन
- पोलीस
- होम गार्ड्स
- कॉलेज-शाळेतील विद्यार्थी
- राष्ट्रीय कॅडेट कोर (NCC)
- राष्ट्रीय सेवा योजना (NSS)
- नेहरू युवा केंद्र संघटन (NYKS)