Atal Canteen Yojana 2025 In Marathi : गरीब नागरिकांना मिळणार 5 रुपयात जेवण

Atal Canteen Yojana 2025 Information In Marathi : या योजनेचा कोणाला फायदा?

Atal Canteen Yojana : दिल्ली सरकारने दिल्लीतील झोपडपट्टी परिसरामध्ये राहणाऱ्या गोरगरिबांना 5 रुपयात ताजे आणि पोषक जेवण मिळावे यासाठी अटल कॅन्टीन योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत दिल्लीतील वेगवेगळ्या झोपडपट्टी परिसरामध्ये 100 कॅन्टीन सुरू करण्यात येणार आहेत.

Atal Canteen Scheme याची घोषणा दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी अर्थसंकल्प सादर करत असताना केली आहे. यासाठी या अर्थसंकल्पामध्ये मोठी तरतूदही करण्यात आली आहे.

Atal Canteen Scheme दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी नुकताच दिल्लीचा अर्थसंकल्प सादर केला आहे. आर्थिक वर्ष 2025-26 साठी 1 लाख कोटी रुपये चा अर्थसंकल्प त्यांनी सादर केला. राजधानी दिल्लीमध्ये 27 वर्षानंतर भाजप सरकार पुन्हा स्थापन झाले आहे आणि हा त्यांचा पहिला अर्थसंकल्प होता.

रेखा गुप्ता यांनी या अर्थसंकल्पामध्ये दिल्लीतील प्रमुख मुद्दे समोर ठेवून अनेक घोषणा केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी बीजेपी ने निवडणूक काळामध्ये दिल्लीतील जनतेला दिलेल्या अनेक आश्वासन पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. याच आश्वासनापैकी एक असलेल्या अटल कँटीन योजना आहे.

या अर्थसंकल्पामध्ये 100 अटल कॅन्टीन सुरू करण्यासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याची घोषणा त्यांनी केली आहे.

Atal Canteen चला तर मग आज आपण दिल्ली सरकारने सुरू केलेली अटल कॅन्टीन योजना म्हणजे काय आहे? आणि या योजनेचा कोणाला लाभ मिळतो? याची संपूर्ण माहिती या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.

यांना मिळेल अटल कॅन्टींग योजनेचा लाभ

Atal Canteen Yojana Benefits

दिल्ली सरकारची अटल कॅन्टीन योजना तामिळनाडू मधील अम्मा कॅन्टींग आणि कर्नाटक मधील इंद्रा कॅन्टीन च्या धरतीवर तयार करण्यात आलेली योजना आहे. दिल्ली सरकार या योजनेअंतर्गत शहरातील झोपडपट्टी असलेल्या 100 वेगवेगळ्या ठिकाणी एकूण 100 कॅन्टीन सुरू करणार आहे. म्हणजेच एका परिसरात एक कॅन्टीन सुरू होणार आहे.

Atal Canteen Yojana अटल कँटीन या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे दिल्लीत झोपडपट्टीमध्ये राहणारे गरीब लोकांना चांगले आणि गरम कमी किमतीत ताजे आणि पोषक भोजन उपलब्ध करून देणे हा आहे. झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांना अटल कँटीन द्वारे केवळ 5 रुपयांमध्ये गरम आणि ताजे जेवण मिळणार आहे.

अर्थसंकल्पात यमुना स्वच्छता आणि प्रदूषणवर भर

Atal Canteen Yojana दिल्लीच्या भाजप सरकारने सादर केलेल्या पहिल्या अर्थसंकल्पामध्ये यमुना स्वच्छता महिलांना आर्थिक सक्षम करणे पायाभूत सुविधांचा विकास करणे पाणी आणि कनेक्टिव्हिटी सह 10 क्षेत्रावर विशेष भर देण्यात आला आहे.

Atal Canteen Yojana 2025 दिल्लीच्या अर्थमंत्री म्हणून काम करणाऱ्या रेखा गुप्ता यांनी 2025 -26 साठी तरतुदीमध्ये दुप्पट वाढ केलेली आहे. दुप्पट म्हणजेच 28 हजार कोटी रुपये करण्यात आले आहे. आर्थिक वर्ष 2025 -26 साठी अर्थसंकल्प मागील आर्थिक वर्ष 2024-25 च्या तुलनेमध्ये 31.5% अधिक आहे.

Atal Canteen Yojana 2025 दिल्ली सरकारने या अर्थसंकल्पामध्ये प्रदूषण आणि यमुना नदी स्वच्छता आणि पुनर्जीवन करण्यासाठी विशेष भर दिलेला आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात तरतूदही करण्यात आलेली आहे. यमुना नदीचे पुनर्जीवन साबरमती रिव्हर फंड प्रोजेक्ट पासून प्रेरित आहे.