Thakkarbappa Yojana 2025 Information In Marathi : काय आहे योजना, कोणाला होतो लाभ
Thakkarbappa Yojana : राज्यातील आदिवासी बहुल गावांचा विकास करण्यासाठी राज्य सरकारने ठक्करबाप्पा नावाची योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून आदिवासी गावांचा विकास करण्यात येणार आहे.
Thakkarbappa Yojana 2025 In Marathi राज्यातील आदिवासी गावांचा विकास करण्यासाठी आणि त्यांना प्रवाहात आणण्यासाठी राज्य सरकारने ठक्करबाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून अनेक जिल्ह्यातील आदिवासी बहुल गावांच्या विकासासाठी ही योजना काम करणार आहे.
या योजनेच्या माध्यमातून या गावांचा विकास कसा करता येईल यावर भर देण्यात आला आहे. या योजनेसाठी राज्य सरकारने 14 कोटी 59 लाख 69 हजार रुपयांचा निधी ही मंजूर केलेला आहे.
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना
Thakkarbappa Yojana 2025 राज्यातील अनेक जिल्ह्यातील आदिवासी बहुल अशी गावे आहेत ज्या गावांचा आतापर्यंत विकास झाला नाहीये. आतापर्यंत ते मुख्य प्रवाहात नाहीत दुर्गम भागात आणि जंगलात असल्यामुळे त्या गावापर्यंत रस्ते पण पोहोचलेले नाहीयेत अशा गावांचा विकास करण्यासाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे.
Thakkarbappa Yojana Information आदिवासी समाजाच्या विकास आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दलित वस्ती योजनेच्या धरतीवर राज्य सरकारने आदिवासी बहुल गावांचा विकास करण्यासाठी ठक्करबाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 2004-05 पासून ही योजना राज्यात काम करत आहे.
Thakkarbappa Yojana In Marathi राज्यातील वर्धा, भंडारा, रायगड, अकोला, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, नागपूर, पुणे, धुळे, गोंदिया, अमरावती, बुलढाणा, नांदेड, यवतमाळ या जिल्ह्यातील आदिवासी समाजाची संख्या मोठी असल्याने ही योजना या जिल्ह्यात राबवली जाते.
Thakkarbappa Yojana In Marathi 2024-25 या वर्षासाठी या जिल्ह्यातील गावातील पायाभूत सुविधांसाठी 390 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या निधीच्या माध्यमातून आदिवासी बहुल गावांचा विकास करणे आणि त्यांना पायाभूत सुविधा पुरवणे हा सरकारचा मुख्य उद्देश आहे.
Thakkarbappa Yojana In Marathi राज्य सरकारने सुरू केलेल्या ठक्करबाप्पा योजनेच्या माध्यमातून आदिवासी गावांचा नागरी सुविधा मजबूत करण्यात येणार आहेत. या योजनेअंतर्गत गावातील रस्ते, सांडपाणी, नाल्या, समाज मंदिर, स्मशानभूमी शेड आणि अन्य नागरी सुविधांची कामे करण्यात येणार आहेत.
Thakkarbappa Yojana या योजनेच्या माध्यमातून आदिवासी गावांचा विकास होत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे, मात्र अजूनही काही गावे आहेत तिथे पर्यंत विकास पोहोचणे आवश्यक आहे.
Thakkarbappa Yojana मात्र या योजनेच्या माध्यमातून काही आदिवासी नेते नाराज असल्याचे समोर आले आहे. कारण आदिवासींना कागदपत्रे, जातीचे प्रमाणपत्र मागितले जाते. मात्र ते आदिवासी असल्यामुळे त्यांच्याकडे अनेक प्रकारची कागदपत्रे नाहीत. त्यामुळे ते या योजनेपासून वंचित राहत असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे आणि लाभार्थी मिळत नाहीत म्हणून मग सरकार हा निधी इतर योजनेत वळवतो असा आरोप काही आदिवासी नेते करतात. मात्र सरकारकडून ठक्कर बाप्पा योजनेच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे काम कामे केली जात असल्याचे ठामपणे सांगितले जात आहे.